मला आवड्लेल ‘डॉ.अब्दुल कलाम’यांच मनोगत

July 19, 2006

जबाबदार आपणच…

 

प्रखर राष्ट्रभक्त व ज्यांची खरी वारसदार आजही युवा पिढी आहे, असे आपले राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. राष्ट्रपतींचे तेजस्वी विचार म्हणजे युवकांचे प्रेरणास्त्रोतच आहेत. 


मित्र हो,
भारतीय एवढ्या संकुचित मनोवृत्तीचे का झाले आहेत? आपण आपले सामर्थ्य, कामगिरी का ओळखू शकत नाही? आपले राष्ट्र हे “महान’ आहे. आपल्या देशात घडलेल्या अनेक यशोगाथा आहेत, पण आपण त्यांची दखल घेतो का?
आपण दूध उत्पादनाच्या बाबतीत जगात सर्वश्रेष्ठ आहोत, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटच्या बाबतीत आपल्या देशाचा पहिला क्रमांक लागतो. आपण जगातील दुसरे सर्वांत जास्त गहूउत्पादक राष्ट्र आहोत, त्याचप्रमाणे जगातील दुसरे सर्वांत जास्त तांदूळउत्पादक आहोत. डॉ. सुदर्शन यांच्याविषयी आपण कदाचित ऐकले असेल; त्यांनी एका दुर्लक्षित, आदिवासी खेड्याला एका स्वयंपूर्ण स्वयंचलित समूहामध्ये परिवर्तित केले. अशा लाखो यशोगाथा आहेत… पण आपली प्रसारमाध्यमे वाईट घटना, अपयश आणि संकटे यांनी पछाडलेली आहेत. मी एकदा तेल अवीवमध्ये असताना एक इस्रायली वर्तमानपत्र वाचत होतो. एक दिवसापूर्वीच “हमास’ने बॉम्ब हल्ले केले होते; पण वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मात्र एका कष्टाळू ज्यू माणसाचे चित्र होते. त्याने पाच वर्षांत आपल्या मालकीच्या वाळवंटातील जमिनीचे हिरव्यागार वनराईमध्ये रूपांतर केले होते. देशातील प्रत्येक जण जागृत व्हावा, इतके ते चित्र “प्रेरणादायी’ होते. बॉंबहल्ल्यांच्या मृत्यूच्या बातम्या वृत्तपत्राच्या आतल्या पानांत होत्या. भारतात आपण केवळ मृत्यू, रोगराई, दहशतवाद, गुन्हेगारी यांच्याच बातम्या वाचतो. आपला दृष्टिकोन एवढा नकारात्मक का आहे? आणखी एक प्रश्‍न ः आपण एक “राष्ट्र’ म्हणून विदेशी गोष्टी स्वीकारण्यास एवढे आतुर का झालो आहोत?
आपल्याला परदेशी कंपन्यांचे दूरचित्रवाणी संचच हवेत. ब्रॅंडेड शर्टस हवेत, आपल्याला विदेशी तंत्रज्ञान हवे आहे…
सगळ्या “इंपोर्टेड’ गोष्टींकडे आपला एवढा ओढा का?
“स्वाभिमान’ हा “स्वावलंबनातून’ येतो, ही साधी गोष्टसुद्धा आपल्याला का कळत नाही?
मी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात असताना, १४ वर्षांच्या एका मुलीने मला “स्वाक्षरी’ मागितली. मी तिला विचारले- “”बाळा, तुझे आयुष्यातील ध्येय काय आहे? ती म्हणाली- “”मला, विकसित भारतात राहायचे आहे!तिच्यासाठी… नव्हे तर येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही आणि मी मिळून उद्याचा भारत उभा करायचा आहे. भारत हे विकसनशील राष्ट्र नसून, ते अत्यंत प्रगत व विकसित राष्ट्र आहे, हे तुम्हीच जाहीर करणार आहात.

तुम्ही म्हणता, आमचे सरकार अकार्यक्षम आहे.
तुम्ही म्हणता, आमची नगरपालिका कचरा उचलत नाही.
तुम्ही म्हणता, दूरध्वनी चालत नाहीत.
तुम्ही म्हणता, आमचा देश कुत्री आणि रस्त्यांवरच्या त्यांच्या घाणीला कंटाळला आहे.
आपण बोलतो… बोलतो आणि फक्त बोलतच राहतो! पण आपण “याकरिता’ काय करतो?

सिंगापूरमध्ये तुम्ही रस्त्यावर सिगारेटची थोटकं टाकू शकत नाही किंवा दुकानांबाहेर उभे राहून खाऊ शकत नाही.

तुम्ही संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत ऑचर्ड रस्त्यावरून (मुंबईतल्या पेडर रोड एवढा) वाहतूक करण्याकरिता सिंगापुरी ५ डॉलर (अंदाजे ६० रुपये) मोजता.

दुबईमध्ये रमजानच्या महिन्यात रस्त्यावर खाण्याची तुमची हिंमतही होणार नाही.

तुमची टेलिफोनची बिले कमी करण्यासाठी तुम्ही लंडनमधील टेलिफोन एक्‍स्चेंजच्या अधिकाऱ्यास १० पौंडामध्ये (अंदाजे ६५० रुपये) विकत घेणे शक्‍यच नाही.

बनावट प्रशस्तिपत्रके, पदवी प्रमाणपत्रे व परीक्षेत घोटाळा करणारे मध्यस्थ तुम्ही बोस्टनमधील विद्यापीठांत वापरू शकत नाही.

… आपण अजूनही फक्त एकाच विषयाबद्दल बोलत आहोत, तुमच्याबद्दल!

तुम्ही परदेशातल्या यंत्रणेची वाहवा करता, त्यांचे पालन करता; मात्र आपल्या देशातल्या नाही. ज्या क्षणी तुम्ही भारतीय भूमीवर उतरता, रस्त्यावर कागदाचे कपटे टाकण्यास, सिगारेटची थोटके टाकण्यास सुरवात करता….

आपण परदेशी एखाद्या व्यवस्थेचे पालन करू शकतो, त्यात समरस होऊ शकतो; त्यांचे कौतुक करू शकतो; तर भारतात का नाही?

आपण आपल्या देशात आपले लाड व्हावेत म्हणून नकारात्मक दृष्टिकोनातून बसून राहतो आणि शासनाने सर्व काही करावे, अशी अपेक्षा ठेवतो.

आपण रस्त्यावर कचरा फेकतच राहून शासनाने तो स्वच्छ करावा, अशी अपेक्षा ठेवतो.
हे सर्व जनतेला “सेवा’ प्रदान करणाऱ्या कर्मचारी वर्गालासुद्धा लागू आहे.

स्त्रिया, मुली, हुंडा, जातिव्यवस्था आणि इतर ज्वलंत सामाजिक प्रश्‍नांबाबत आपण रस्त्यावर निषेध व्यक्त करतो; आणि घरात मात्र “तेच’ करतो.

आपली सवय म्हणजे सगळी यंत्रणाच (system) बदलणे गरजेचे आहे. माझ्या एकट्याच्या बदलण्याने काय होणार, असे म्हणत आपण हुंडा मागतोच. तर आता मला सांगा- ही व्यवस्था कोण बदलणार? या व्यवस्थेचे भाग कोणकोण आहेत?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपले कुटुंबीय, शेजारी, आपली खेडी, आपली शहरे, आपले सरकार आणि स्वतः आपण! व्यवस्थेला सुधारण्यासाठी आपण आपला हातभार लावण्याची ज्या वेळेस गरज असते, त्या वेळेस आपण स्वतःला स्वतःच्या कुटुंबीयांसमवेत एका कोशात बांधून दूर उभे राहतो. आणि कोणी तरी येऊन आपल्यासाठी ते करावे, ही अपेक्षा ठेवतो. आपण देशात राहतो; पण आपल्या कर्तव्यापासून दूर पळतो. भयाने पछाडलेले भ्याड लोक पळत राहतात.

आपण अमेरिकेत त्यांच्या वैभवाची, त्यांच्या मोठेपणाची ऊब घेत त्यांच्या व्यवस्थेचे कौतुक करतो; पण ज्या वेळेस न्यूयॉर्क “असुरक्षित’ वाटू लागते, आपण इंग्लंडला पळतो.

जेव्हा इंग्लंडला आपण बेरोजगारी अनुभवतो, आपण आखाती देशात पळतो. आणि जेव्हा तेथे युद्ध चालू होते; आपण आपल्या सुटकेची आणि मायदेशात शासनाने परत आणण्याची मागणी करतो!

सगळे जण देशाला, व्यवस्थेला शिव्याशाप देण्यास पुढे येतात. कोणीही व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी हातभार लावत नाही, पुढाकार घेत नाही. एवढंच काय, साधा विचारही करत नाहीत.

आपली सदसद्विवेकबुद्धी व कर्तव्याची जाणीव पैशापुढे गहाण टाकली जाते.

प्रिय भारतीयांनो,
आपल्याला विचारपरिवर्तनाची व आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज आहे.
आपल्या अमेरिकन सहकाऱ्यांना जॉन एफ. केनेडींनी भारताविषयी जे विचार सांगितले, ते मी येथे सांगू इच्छितो…
“भारतासाठी आपण काय करू शकतो ते पाहा, आणि अमेरिका व इतर युरोपीय देशांप्रमाणेच भारताला प्रगत बनवण्यासाठी जे जे आवश्‍यक आहे ते करा!’
तेव्हा, चला तर आपण “आपल्याच’ परमपवित्र मातृभूमीसाठी जे जे आवश्‍यक आहे, ज्याची आपल्या राष्ट्राला गरज आहे, ते करू यात!
आपला,
राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम


प्रतिसाद – एक संजिवनी

July 12, 2006

प्रत्येक सभासद हा आपल्या ब्लॉग वर प्रेम करीत असतो. त्याच्या ब्लॉग

विषयीच्या भावना वेगवेग्ळया प्रकारे प्रकट होत असतील पण ऊत्कट्ता

सारखीच.शक्य होईल त्या प्रमाणे त्याला तो सजवण्याचा प्रयत्न ही

करतो. आपापाल्या कुवती प्रमाणे मनात काही आराखडे तयार करतो. येथे

कुवत म्हणजे दुसरयाने वाचुन ठरवलेली असते ती. कारण स्वताःच्या

ब्लॉगवर लीहीताना त्याच्या द्दुष्टीने कुवत नेहमी असीमच असते. त्यावर विश्वास

ठेवुन तो वाट्टेल ते वाट्टेल त्या वेळॆला लीहीत असतो.तसे व्यक्ती स्वातंत्र

आणी विचार स्वातंत्र त्याला या नेट्नेच बहाल केले.त्यामुळे बुद्धी आणी मन

यांची सांगड घालत आपल्या लाड्क्या ब्लॉगचे आयुष्य वाढ्वायच. अता मन

आणी बुद्धी हे तराजुत टाकलेल्या लोण्याच्या गोळ्या प्रमाणे असतात. कारण

मन या  विषयी कोणीही मापदंड लावु शकत नाही. एकवेळ त्या सागराची

कीती खोली? ते कळेल पण मनाची? ते शक्य न्हवे. कधी ते जगाने निषेध

केलेल्या गोष्टीची पुरर्तता करुन मागेल तर कधी जगातील अमुल्य वस्तुलाही

ठुकरावुन अगदीच साधारण गोष्टीची खातरजमा करेले याचा नेम नाही. तर या

मनाच काही संगता येत नाही. पण बुद्धीच तस नाही. तीला माप दंड आहेत.

म्हणजे तशी सर्टीफीकीटस तर जोड्ली जातात. त्याचा विचार करुन कीतपत

बुद्धी ती ठरवीता येते.अता यातही वादाचे मुद्दे असु शकतात. ज्यांच्या हाती ही

लेबल नाहीत ती ही चांगली खावुन पीवुन आहेत. मीठ्मोठी पद घेवुन कारभार

हावा तसा चालवतायतच की.(बुद्धीचा वापर वेगळ्या प्रकारे करुन, पण त्या

साठीही ती असावी लागतेच.)असो तर  तात्पर्य आसे की बहुतेकांना मन आणी

बुद्धी यांचे सम प्रमाण कींवा मी तर म्हणेन जास्त वाटा

बुद्धीचा घेवुनच लीखाण पारायण सुरु करावे लागते, काही ब्लॉग वाचले की

वाट्त काय प्रंचड बुद्धी आहे ही. पुर्ण मरठी विश्वाचच दर्शन होत.मराठी

साहित्यातले कीतीतरी पैलु त्यांनी आपल्या पुढे मांड्लेले आहेत. कीतीतरी

वेगवेळया विषयांची माहीती ते करुन देतात. त्यांचा सखोल आभ्यास … विषय

मांडण्याची हातोटी  यावरुन त्यांच्या कुशाग्र बुद्धीची चुणुक आपल्याला दिसते.

अर्थात हे त्यानीही मनापासुनच केलल असत. आशा ब्लॉगला आपण मनापासुन

दाद देतो.आशा भव्य दिव्य ब्लॉग समोर आपण म्हणजे शालु समोर

जुनाट धोतर. (ईथे चुकले आपण नाही. मी. नाही तर तुम्ही म्हणाल आमची

पैठणी नेसायची लायकी असताना हे काय धोतर वैगेरे…. )चार चैघात न

दाखवत्या येण्यारया मनाला चोर कप्यात द्ड्वत जे जे चांगले ते तुमच्या

चरणी अर्पण अस काहीस घोश वाक्य यांच असाव. कारण मनाचा तो चोर

कप्पा कप्प्यातच ठेवलेला असतो. व्ययक्तीक भावनांना सार्वजनीक ठीकाणी

कीती व कश्या प्रकारे उघड करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता परत

हा मुद्दा की आपला ब्लॉग हे सर्वजनीक ठीकाण कस,कारण मनातल तर

उघड करायला ही खटाटॊप असते. मग वैयक्तीक झाल, पण तरीही,सार्वजनीक

वाटण्याच कारण – जरी कुणी कुणाला पाहील नाही तरी विचारांच्या माध्यमाने

प्रत्येकाने आपापल्या कुवती नुसार वाचकाच्या मनात स्वताची एक प्रतीमा

तयार केलेली असते. आणी त्याला तडा जावु नये हाच प्रत्येकाचा

प्रयत्न.  म्हणजे  स्वतःवर आपण कीती प्रेम करत असतो ते पाहा.

याच एक उदा. मी तुम्हांला देवु शकते.  

1. पाकक्रुती. 

बटाटा वडा  -  १२ प्रतीक्रीया

भजी – १० प्रतीक्रीया

रसमलाई – १९ प्रतीक्रीया

अता याला काय म्हणायच. आपला चॉईसच असा झालाय की आजु बाजुला न

पाहाता आपल्याच रिंगणात गोल गोल फीरायच. येथे ईतके सुरेख लेख मी

वाचलेत की मन थक्क झाल्या शीवाय राहात नाही.त्याची प्रगल्भता कौतुक

करण्यासारखी आहे. एकाने ‘स्त्री जिवन तुझी काहानी’हा ईतका सुंन्दर लेख

लिहीला आहे.५-६ पाने सहज असेल, कीती निरेक्षण आसेल त्यांच.कीती वेळ

घालवला असेल त्यानी त्या साठी. आधी निरीक्षण, मग विचार मंथन,आणी

मग लिखाण, पण त्या लेखाला एकही प्रतिसाद नाही. एकजण Software

Engineer. त्यानी संगीत शास्त्राची कीती छान माहिती

दिली आहे.कीती आभ्यास आहे त्यांचा त्यावर पण प्रतिसाद नाही.अशी एक

नाही १०० उदा. आहेत. कीती सुंदर कविता आहेत. प्रतिसाद एकही नाही.  तुम्ही

म्हणाल हे व्यक्ती स्वातंत्र आहे.बरोबर. पण हेच कौतुक चौकटीच्या बाहेर पडुन

जरा रुदांवुदेना. म्हणजे आप भी खुश - हम भी खुश, सभी खुश .

२.एक कविता –  स्त्री  – पुरषात एकच नात, नर मादीच.

येथे आपण २१ व्या शतकातुन एकदम आदिमानवाच्या जंगलात पोहचलो.यांनी

मात्र व्यवहाराला कमी आणी मनाला मोठे पणा देत जे वाट्ल ते खर खर

लीहील. मोठ्या मनाचे राजे.

३.यात साध्या मराठ मोवळी माणसाच्या नावापुढे ‘राव’ न लावता ‘जी’ लावुन

हिंदी भाषेच मराठी भाषेवर होणार अतिक्रमण   या वर गरमागरम चर्चा. नावा

पुढे ‘राव’ लावा नाहीतर ‘जी’ अर्थ एकच. आदराचा.मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश

येथील लोकांना ‘जी’ लावायची सवय असते त्यातुन फक्त आदर भाव

ओळखायचा, की मराठी माणसाला राव का म्हणाला नाही म्हणुन

भांडायच?तस राव ही खुप जुन झालय. अता राव म्हटलेल आवडेल कोणाला ?

४. ‘मी हे आयुष्य का जगतोय?’  हा पहिला लेख आहे ज्याने व्यवहारी बाजु

बाजुला ठेवली आणी अगदी मन मोकळ केल.हे धाड्स कोणाचाच झाल नाही.

प्रत्येकाच्या हातुन कोठेना कोठे चुक झालेली असते.(लाहान मोठी.) मन ती

कुठेतरी व्यक्त करायला  मागत असत, पण आड येते आपली अस्मिता. ती उघड

पाणॆ मांड्ली उपेन यांनी. ते त्यांच्या आयुष्यात चुक की बरोबर हे त्यांनाच

माहित. पण वाचकाने तो लेख  वाचल्यावर एवढ तर लक्षात येत की आपण

नाही या जंजाळात/ कींवा आहोत तर वेळीच सावध झाल पाहिजे. एवढ झाल

तरी त्या लेखाने खुप मीळ्वले.  प्रतिसाद एकही नाही.

मला फक्त एवढच वाटत आपण जेव्हां ब्लॉग उघडतो त्यावेळी बाकीच्य लेखांवर

नजर मारतोच.कोणी शिता वरुन भाताची परिक्षा करुन एकदोन ओळीत आपले

वाचन आटोपते घेतो तर कोणी पुर्ण लेख वाचतो. पण वाचतो आपण सगळेच.

मग वाचलेच असते तर त्यावर टिपणी द्यायला काय हारकत आहे. फार वेळ

जाणार नाही आपला,आपण जे काही लीहु ( चुक वाट्ले तर काय चुकले?

यातुन त्याच्या त्या विषयाला नविन द्रुष्टीकोन मीळ्तो. आपण आपल्या विचार

मंथनात कुठे कमी पड्लो ते कळ्त.आणी विचार आणखी प्रगल्भ

होतात.आभ्यास पकका होतो. तुम्ही म्हणाल आम्ही कोणाला शिक्षण देण्या

साठी हा  ब्लॉग सुरु केलेला नाही. बरोबर आहे ते.पण जर वाचतोच आहोत

ईतरांचे ब्लॉग तर एक – दोन ओळीचा प्रतिसाद द्यायला काय हारकत

आहे.आणी जो प्रतिसाद देवु तो मनापासुन असावा. ‘वा, खुपच छान, झकास ’

ईथ पर्यंतच मर्यादित न राहाता ‘ नाही पट्ले तुमचे विचार’, माझ्या मते

तुम्ही आमुक एक विचार परत एकदा करुन पाहा.’ असे परखड पणॆ सांगुन ते

विचार आपल्याला रुंदावता आले तर पाहावे. प्रत्येकानेच आपला ब्लॉग

मनापासुन लिहीलेला असतो.कोणीतरी वाचावा म्हणुनच. मग एखादा प्रतिसाद

देवुन आपण त्याला संजिवनी देण्यास काय हारकत आहे? या प्रतिसादानेच

प्ररीत होऊन आणखी चांगले लेख वाचकांन समोर आणतो. या

निमीत्ताने आपल्याला ही आणखी चांगले लेख वाचायला मीळ्तात. आणी

मग आपोआपच आपला ‘माराठी ब्लॉग नेट’ हा आणखी प्रगल्भ होऊन

स्वताःची उंची वाढवत जाईल.  एक मेकास साहाय्य करु अवघे धरु सुपंत. असे

मला वाटते. 


जाणिव

July 10, 2006

ह्ल्ली आपली सांकॄती खूप सुघारीत झाली आहे, असेच चित्र सगाळीकाडे दिसते.  

याला हातभार लावणारी,मागची पीढी, म्हाणजे आपले आई-वाडील. ते बारेच

शिकले.आणि आपल्या मुलानंना त्याही पेक्षा जास्त शिकवीले.आपण  एक खाड्तार

दिवस काढले, आता मुलांना मात्र सुख देउ,” हा विचार कारुन मुलांची लाग्न ठरली,

की तेव्हा पासुनच यांचे सुरु होते,”येथे जागा कामी, नाविन मुलीला अडचान नको,

तुला हावा असल्यास वेगळा फ़्ल्याट घे, आम्ही काय, आहोतच की एकमेकांना.”

माग काय,मुलीच्या भावनांचा विचार केला जातो आणी मुलगा असतो लंपट …..

जर… तर आले की मुलगा सोईने विचार कारतो ….” म्हाणजे आई-वाडिलांना नाही

सांभाळ्ले तारी चालु शकते, तसे ते काही अकदिच म्हातारे नाहित, आणी अधुन

माधुन चाक्कर टाकुन विचार पुस कारायला आहोतच  की आपण.  शिवाय आपल्या

गरजा किती? बायकोची shopping, मुलांचे शिक्षण, त्यांच्या भारमसाठ फीया, याच

खार्चाचा ताळेबंद लागता लागत नाही, त्यात आणखी कुठे, आई-वाडिलांच्या आजार

पाणाचा खार्च,शिवाय त्यानां पेंशन आहेचकी, ती मग काधी कामाला?”

आपल्या मुलांना आई – वाडिलांनीच जाणवुन दीले की,आम्हांला सांभाळ्ने हे तुझे

कार्तव्य नासुन तो तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे. जासा तु जागणार आहेस मरे

पर्यांत, आणी शेवट पर्यांत साथ मागणार आहेस बायको – मुलांची, जासे ते तुझ्या

अयुष्याचा हीस्सा आहेत,तासे आंम्हीही आहोत, तुझे कुटूंब तुझ्या बायका-मुलांन

माध्ये, तसे आमचे तुझ्या माध्ये. तु जासे आयुष्यातुन त्यांना दुर कारु शाकात

नाही, तासेच तु आम्हांलाहि नाही कारु शकत.”  पण या जवाबदारीची जाणीव ही

मानापासुन झाली पाहिजे. त्याला कार्तव्याची झालर लागली की, त्यातला आपले

पणा हरवुन जातो. माला आठवत,लाहानपणी आजीला काही त्रास सुरु झाला की आई

-बाबांची कीती धावपाळ सुरु व्ह्यायची,रात्र-रात्र त्याचीं सेवा आम्हीं सागळे मिळुन

कारायचो, आजोबातर एक दीड वर्ष  बेड वर होते, आई त्यांच

कारुन थकायची,आम्हींही लाहान मोठी मादत  मनापासुन कारायचो, काहीही झाले

तारी आपले आजी – अजोबा वाचलेच पाहीजे हिच काळ्जी आसयची, आणी यात

काही वेगळे आपण करतोय आशी भावना पण नसायची,कारण  बहुतेअक घरांमध्ये

हेच चीत्र दिसायचे.

आणी आता सध्याची स्तीथी तर खुपच वाईट. कारण दहा घरांमागे आठ मुले

तरी पारदेशात आसतात ( कुटुंबासह) . N M C ’s Co. लठ्ठ पगार जो

देतात.पण यांच्या परदेशातल्या छोट्या कुटुबांत त्यांचे आई- बाबा मात्र

नसतात. या आई बाबांना मग आधार आसतो तो थोडा-फार शॆजांर्याचा.

त्यांच्या नातवंडात आपली नातवंड पाहाण्याचा, तरी त्यात शिस्त आड येते. “

जास्त कुणाची घरी जाउन बसु नये,’ पुर्वी वाडे, चाळी आस्यायच्या. तासंतास

आम्हीं एकमेकांच्या घरी बासत आसु,प्रत्येकाचा आपाप्ल्या वयाप्रमाणॆ गट

आसयचा,ती चाळ म्हणजे एक मोठ्ठ कुटूंब असायच.एकाच्या घारी साधे

पाहुणे आले तारी,ही बातमी लागेच सागळी कडॆ पासरायची,आणी मग एका

घरातल्या पाहुण्याच स्वागत सागळी मीळुन करायची.एकाच्या घरी जेवणाला

तर दुसर्याच्या घरी नाशत्याला, पाहुण्यांबारोबर बाकीच्यांची पण मजा.

उन्हाळ्याच्या सुट्टीत तर खुप मजा, रात्री १२ -१ वाजेपार्यंत आम्हीं खेळत

आसु, आणी त्याच वेळी मोठ्यांच्या आंगणात मॆऎफीली जमलेल्या आसयाच्या,

त्या वेळी काधीच कुणाच्या मनात हा प्रश्न येत नसे,”एवढा वेळ मुल भाहेर

आहेत हे बर दिसत नाहि. …..

पण आता फ्ल्याट, सोसाईटी मुळे चीत्रच बाद्ल. फ्ल्याट माध्ये एकटे

राहानारया आजी – आजोबांना विचाराव लागत, ” काय आहे.. , तु माझ्या

मुली सारखी,आमच्याहिला hart-problem आहे,तेव्हां रात्री काधी त्रास

झालाच तर तुला उठावले तर चालेल ना? म्हनजे गाडीतुन आपल्याला पाट्कन

जाता येइल.माझी गाडी आहे ग, पण रात्रीच डॊळ्यांना नीट दिसत नाही.

शेजारच्यांनी आजुन तेवढी माणुसकी जापली आहे. त्यामुळॆ त्यांच्या एकटे

पाणाची जाणीव, ठेवुन आधुन माधुन नाश्टया,  जेवण यांची देवाण घेवाण होत

आसते. आजारी  पाडलच तर विचार पुसही होते. आणी आजी – आजोबांना

दुधाची ताहान ताकावर भागवावी लागते, परदेशातल्या मुलाला याची खाबर हि

नसते.  आणी लांब राहात आसलेल्या मुलाला सांगुन काशाला त्रास

दयायचा,नाहितरी तो काय कारु शकणार आहे, आसे म्हणत दिवस धकलायचे.

आणी मुलगा….. मुलगा मात्र आपण आगदी न चुकता आई ला फोन कारुन

काशी विचार पुस कारतो, यातच धन्य मानुन घेत असतो.

तुमचं | ashwini (not verified) | ०१ जुलै २००६ - १५:५५

तुमचं निरीक्षण बरोबर आहे.
आई-वडिलांनीच सुरुवातीपासून मुलांना सैल सोडायला नको. मी नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करीत असूनही मला असं वाटतं!

जबाबदारी (दुसरा दृष्टीक༯a> | saket_bagade | ०३ जुलै २००६ - १३:०९

मला या बाबतीत अजून एक बाजू मांडावीशी वाटते:

माझ्या माहितीमध्ये अशी 2 कुटुंबे आहेत की ज्यांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत. दोन्ही ठिकाणी परिस्थिती साधारण अशी आहे – आजोबा-आजी दोघेच घरी असतात. मन रमविण्यासाठी शेजारी-पाजारी जाणे, पर्यटन करणे असे चालूच असते. पण त्यांची मुलगी, जावई व नातवंडे त्यांच्याच शहरात असल्यामुळे स्वाभाविकपणे हे आजी-आजोबा आपल्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करीत असतात. मुलीचा साहजिकच आपल्या आई-वडिलांकडे ओढा असतो. आणि काहीतरी किरकोळ कारणांवरुन तिचे तिच्या सासू-सासर्‍यांशी वाद वाढत जातात. आता ह्या हसत्या-खेळत्या घरात विनाकारण कटकटी वाढतात आणि शेवटी त्या घरात सुद्धा फूट पडते. जावयाला बायको आणि आई-वडील यांच्यामध्ये बायकोची बाजू घेणे भाग पडते आणि अजून एक आजोबा-आजी आपल्याच मुलाला पारखी होतात…

अशा गोष्टींना जबाबदार कोण? परदेशात गेलेली मुले? मुलांचे सुख न मिळाल्यामुळे मुलीच्या संसारात विष कालवणारे तिचे आई-वडील? लहान मुलांकडे बघून बायकोची बाजू घेणारा नवरा? की आपल्या लहान मुलांपासून एक आजोबा-आजी हिरावून घेणारी मुलगी?

मला वाटते की प्रत्येकाने आपआपली जबाबदारी नीट पार पाडली तर कोणीच दु:खी होणार नाही…