‘नाम्याची आई’.

July 25, 2006

‘नाम्याची आई’ ही गहाळ झालेली माझी आवड्ती आवृत्ती काही थोर व्यक्तींनी मीळवुन दिली,त्या बद्दल नम्र होत मी ही त्यांना  अर्पण करीत आहे.

आज आपल्या भारतात हजारो स्त्रियांच्या आयुष्याची रोजची पाहाट अशीच उगवत असते. कींवा याही पेक्षा वाईट. त्यात आणखी मोठ मोठी संकटे पण येतात ती वेगळीच.प्रत्येक परीस्थीला  मोठ्या हिमतीने…धीराने…त्या सामोरे जातात.त्यांच्या त्या मनोबलाला माझे शत.. शत…प्रणाम…..

‘’आई,खायला काय हाय का ग?”’नाम्याने आईला विचारत खाली बस्तान ठोकले.” त्याच्या आईने चुलीवर भाताचे आधाण ठेवले होते.
भात शिजला का ते पाहात तीने विचारले, ‘’कार; राजा, यई भुक लागली व्हय?, झाल बग, वाईच थांब. अत्ता वाढ्ते बघ.”
नाम्यान आईने काय कायकेलय याचा अंदाज घेत विचारल ”काय केलेल हाय?”’

तिला ह्या प्रश्नाच उत्तर द्यायला जड जात होत.पण ती कसबस बोलली,” वांग्याच कालवण आणी भात.”ते ऐकताच नाम्या फणफणत बोलाला,
’मला नग ते, रोजरोज कलवण आणी भात.” तु दुसर कायबी करत नाय.येवुन जाउन तेच तेच खावु घालतीया.मला आज भाकरी…
नाय…., ती पण ईतकी नाय आवडत …मला आज चपाती आणी भेंडीच कालवण पायजे.त्या शेजारचा बंड्या कड बग जरा, कसा राहातुया….
..कीती चांगली कापड आणतीया त्याची आय…शाळला येताना कसा रुबाबात येतोया… आणी… मास्तरान सांगितलेली सगळी पुस्तक पण हायती त्या
कड…..मला आपल एक….. दोन पुस्तकावरच पाठ्वतीया..शाळेचा गणवेश पण फाटलया…. मला लाज वाट्तीया आय… तुला कस गं नाय
कळत..?.. ”’

ते ऐकुन त्याच्या आईचा जीव एकदम कासावीस झाला. तीला आपल्या पोराच्या गरजा कळ्त होत्या. पण तीचा पण नाईलाज होता. ती दहा घरची
काम करत होती. हाजार बाराशे रुपायात कसबस घर चालवत होती. नाम्याचा बाप दारुडा. रोज दारु पीवुन धींगाणा घालणारा.दोन वेळ्च पोटात तर
टाकाव लागत.त्यात नाम्याच शिक्षण. खर्च झेपत नसतानाही तीने नाम्याला जरा बरया पैकी शाळेत घातले होते.शाळेच्या फीया ही तुंबल्या होत्या.
नाम्याचा मास्तराने दोन दिवसापुर्वीच तीला बोलवण धाडल होत.कशाकरता हे तीला माहीत होत.पण वरचे पैसे आणणार कुठुन? नाम्यासाठी ताटात
कालवण आणी भात वाढता वाढता तीने मनाशी ठरवल. उद्या कसही करुन उसने पैसे घेवुन नाम्याच्या काही गरजा तरी पुरवायच्या.आणी मग ती
आपल्या लाडक्या पण तोंड फुगवुन बसलेल्या मुलाची समजुत काढ्त त्याला भरवु लागली.

आज नाम्याची आई नेहमी पेक्षा जरा लवकरच उठली. मुलगा,बाप,आणी स्वता:च्या ड्ब्यासाठी पटापट स्वंयपाक केला. मग नाम्याला उठ्वल.एकी
कडे अंघोळीसाठी त्याला पाणी गरम करायला ठेवल.मग पाण्याचा हांडा घेवुन ती बाहेर पाणी भरायला गेली. २-३ हंडे पींपात ओतुन झाले तरी नाम्या
अजुन उठला न्हवता. मग परत उठवत ती बोलली.’अरं कीती येळा उठवायच तुला..?.. अता उठ बेगी…नाय तर.. दणका दिलाच बघ..
त्याला ही माहीत होत . दोन तीन आवाजा नंतर दणका मीळेलच.. म्हणुन तो लगेच म्हणाला.. ”मी जागाच हाय.. पण म्या आज नाय
जानार..तीथ मास्तर समदया मदी मला उभ करुन ईचारतात… दोन महीन्याची फी आजुन आली नाई…दोन दिसात भर. नाय तर तुझ्या आईला
बोलवलय म्हणुन सांग…. मला नाय आवडत ते. तु पैस दे. मग म्या जातु.”’ ते ऐकुन तीला अगदी भरुन आल. भरलेले डोळे हाळुच
पुसत ती त्याच्या डोक्यावरुन हात फीरवत बोलली. ‘’नाम्या… मला सांग मला काय कळ्त नाय का रं… दिवस भर राबुन… पण.. कसबस
भागत… दोन म्हईन्यापासुन तुजी फी जमोती हाय… काय न काय खर्च येवुन खर्च होतीया.. हे बग राजा.. आज तु जा. मी काय बी बंदुबस्त
करुन उद्या देतेच बग….”

नाम्या जरा नाखुश होउन शाळेला गेला. मग स्वताच पट्पट अटपत तीन नवरयाला उठवायला सुरवात केली.” आव.. .उठा आता….दिस
डोक्यावर आलाय.. आन तुमी पड्लाय अजुन.. येळ्वर कामाला नाय गेला तर ही बी नौकरी जायची हातची.. ‘’ तो काय जागचा हालत नाही
ते पाहुन तीला अजुनच राग आला. चीढुन त्याच्या डोक्यावरची चादर बाजुला करत परत बडबडायला लागली..” कीती येळा सांगुन झालया..
कामावर लवकर जाव…अस दांड्या मारुन मग पैस कमी मीळत्याती.. त्यात तुमची दारु.. वाट लावतीया पगाराची… नाम्याची फी तुंबलीया..
आननार हाय का पैस..म्या कुठ ..कुठ बघु बाय मानुस.. तरी घर म्याच चालवतीया..” तीच्या तोंडाचा पट्टा अता थांबणार नाही,हे पाहुन
तीचा नवरा पण तीच्या वर खेकसत बोलला”’ झाली का तुझी वटवट सुरु? … सकाळी सकाळी अस ओरडाया मी तुझ्या बा चा नैकर हाय वै ग..?”
सकाळी अशी टाळक्यात घुसु नग..नायतर दोन ठेवुन देतुया बग…” हे ऐकुन ती जरा मागे सरकली. तीला माहीत होत.. आता आजुन जर
जास्त बोललो तर.. दणके आहेतच. ‘’काय….करायच ते करा.” अस बोलुन ती आपल्या कामावर निघाली.

दाराबरची बेल वाजवली. दार उघडे पर्यंत तीने स्वताची साडी नीट करुन घेतली.मग दार उघडल. “काय आज अगदी वेळ वर आल्यात बाईसाहेब.”
घ्रर माकणीचा टोमणा आपल्याच आहे हे माहित आसुनही उगीच हासत रोजची काम तीने हातात घेतली. एकीकडे काम भराभर आवरत असताना ती
विचार करु लागली, कसा पैशाचा विषय काढु? पण तीला भागच होत विचारण. शेवटी मनाच धाडस करुन तीने बोलायला सुरवात केली.”
वईनी झाली बगा काम. साहेब नाहीत न्हव.”’ ते नाहीत याची खात्री करत मग तीने परत सुरवात केली.”’मला वाईच पैशाची नड होती बगा.
नाम्याची फी भरायची हाय. शंभरच्या चार नोटा पाहीजेती.” ते ऐकुन तीची मालकीण लेगेच म्हणाली. काग ग? मागच्याच महीन्यात तु जास्त
पैसे घेतले. अता परत नाही देणार.तुझ दर दोन चार महीन्याने चालुच असत.आणी तु दर वेळी माझ्याच कडे का मागते? दुसरे काय तुला दिसत
नाही? का तीथे पण असच मागत बसते? ” ते ऐकुन तर तीला जाम दडपण आल. पडलेल्या चेहरयाने कसबस ती बोलली”’ बाई मला काय
आवडत व्हय उसन मागाया? लईच नड हाय म्हणुव मागतीया. आनी दर महीन्याच घ्याना कापुन.”
तीचा पडलेला चेहरा पाहुन कदाचीत तीच्या मालकीणीला पण दया आली असावी. नेहमी नेहमी असे उसने पैसे मागणार नाही या वाद्यावर तीने पैसे मीळवले.
बाकीच्या घरची कामे ती पटापट करीत होती.

दुपारची वेळ टळुन गेली होती. अता तीला घरचे वेध लागले होते. नाम्या घरी केव्हाच आला असेल. सकाळ्च केलेल हातानेच वाढुन घेत नाक मुरडत
कसबसे त्याने दोन घास गीळ्ले असतील.नवरयाचा काही अजुन पत्ता नसेल. कामावरुन तो तसाच दारुच्या अड्यावर गेला असनार. या विचारात तीची
पावले झपाझप घरच्या दिशेने पडत होती. वेळेवर पैसे मीळाल्याने ती बरीच खुश झाली होती. कधी जाउन नाम्याला सांगते अस तीला झाल होत.

घरी आल्या आल्या तीने पैसे देवळीत ठेवले.आणी लेगेच तीला आठ्वल दोन तीन वेळा आसेच देवळीत ठेवलेले पैसे नवरयाने उडवले होते. जास्तीची दरु
पीवुन त्याने केलेली भांडण,मारामारी,शीव्याशाप…..तीच्या मनात त्याच्या बद्द्ल तीरस्काराची भावना तरळुन गेली.एक उसासा टाकत आधी तीने
ते पैसे तांदळाच्या डब्यात रोवुन ठेवले.

नाम्या तीला दिसला नाही.तो बाहेत खेळत असेल असा विचार करुन ती हात पाय स्वच्छ धुवुन,पदर सावरुन संध्याकाळ्च्या स्वंयपाकाला लागली. बराच
वेळ झाला तरी नाम्याचा अजुन पत्ता नाही पाहुन परत तीचा पारा चढायला लागला. ती मग त्याला पाहायला बाहेर गेली. नाम्या बाहेर गोट्या खेळत
बसलेला पाहुन तीला अजुन राग आला. त्याचा कान पकडत तीने त्याला उभे केले.”’नाम्या …. काया..रं .. ईथ .. खेळत बसलाया…
अन आभ्यास कोन करनार हाय…?…आधी घरला चल.. फेक ते गोट्या…” नाम्या पण मुकाट्याने घ्ररी आला. तीला आभ्यासातल काही कळत
न्हवत पण तीने दोन तास त्याला आभ्यासाला बसवल..मध्येच त्याची जरा चुळ्बुळ सुरु झाली की त्याला दामटत होती. त्याचा आभ्यास चालला
असतानाच त्याचा बाप कोणाशी तरी भांडत असल्याचा तीला आवाज आला. बाहेर जाउन पाहाते तर तो पुर्ण दारुच्या नशेत झिंगलेला, कोणालातरी
हातवारे करीत शिव्या हासडत होता. त्याला त्या आवस्थेत पाहुन ती परत खुप चीडली,कसबस त्याला ओढत तीने घरात आणल.मग नवरा बायकोची
बाचाबाची सुरु झाली. नाम्या साठी हा तमाशा रोजचाच होता. त्याच आभ्यसात लक्ष लागेना.त्याने तो आटोपता घेवुन आईला जेवायला वाढायला
सांगीतल. मग नवरयावरच लक्ष काढुन घेत नाम्याला, नवरयाला वाढ्ल, जेवुन सगळी सावरासावर करुन थकुन ती जरा भींतीला टेकुन बसली.थोडा
वेळ असाच गेला आणी तीला मळ्मळु लागल. थोड्या वेळाने परत कोरड्या ओकारया येवु लागल्या. “अलीकडे दोन चार दिवसापासुन अस का होतया?”
हा विचार करु लागली, आणी एकदम डोक्यात आल तीच्या, ”जीवात जीव आलाय……” त्या जाणीवेन तीच मन एकदम मोहरुन आल….
पण….. लगेच तीचा चेहरा पडला. ” काय कराव?…. घराची अशी तीन तेरा, नाम्याचच शिकण झेपेना, त्यात हे दुसर पोर……तो
तसा दारुडा… दुसरया कुनाचा आधार नाय….जाव का उद्या डाकटर कड…?”विचार करता करता तीची नजत नाम्या कडे गेली. नाम्या शांत झोपला होता.
त्याचा निरागस चेहरा पाहुन तीच उर भरुन आला.त्याच्या केसातुन हात फीरवत परत विचारात गर्क झाली…” हे एक होऊ द्याव. नाम्याला खेळाया एक
भईन मीळल.तो पार एकटा पडतुअया. पैशाच काय… अजुन दोन काम जास्त करु या.. पण या जीवाला अस माराया नग… दोघासनी संभाळ्तुया….
आता तीघासनी संभाळु…पण त्याला आपुल्या म्होर कोनी तरी पाईजया…” विचार करताना तीचा हात नकळ्त तिच्या वाढलेल्या पोटावरुन प्रेमाने फीरु लागला.
चेहरयावर मायेची दाट छाया पसरु लागली..विचारात दंग असताना मागुन नशेत झिंगलेल्या नवरयाचा आवाजाने तीची तंद्री भंग झाली.तो तीला बोलवत
होता.”’ईकड य्य..”’ त्यावर तिरस्काराने बघत ती म्हणाली…. “नाय. झोपा गुमान…”

एवढ बोलतेना बोलते तोच तिच्या डोक्यात एक जबरदस्त कळ आली. मागुन तीचा नवरा तीचे केस ओढ्त होता. आणी एका हाताने तीचा हात तो
मगच्या बाजुला पीरगळु लागला होता. तीला असाह्य वेदना होऊ लागल्या…. डोळ्यातुन अश्रु वाहु लागले……पण शेवटी तीची तकद त्या पुढे कमीच
पडली. तीच शरीर एकदम शीथील झाल….निःप्राण….. त्यात काही जीवच उरला न्हवता….चेहरा अगदी निर्वीकार…..काळवंडला होता.
फक्त तीच्या डबडबलेल्या डोळ्यात एकच विचार दिसत होते…… नाम्या पैस कुठ हारवुन बसला तर…?….. उद्या त्याची फी भराया आपुनच जाव का?…


त्रिकोण

July 22, 2006

तो एका मोठ्या कंपनीत कामाला होता. लहान पणापासुन चाकोरी बद्ध जीवन जगत आलेला.शाळा , कॉलेज मध्दे अतीशय हुशार मुलांमध्ये गणला जाणारा. वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धेत कायम चमकणारा.त्याच्या सुंदर व्यक्तीमत्वात या सगळ्या गोष्टी कायम  भर घालीत.त्यामुळे साहाजीकच सगळ्यांचा आवड्ता. कंपनीतही त्याची अशीच छाप पड्लेली.तो ग्रुप मध्दे सगळ्यांचा लाड्का होता.  कोणत्याही विषयावर तो बोलु लागला की सगळी मंडळी मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत.

त्या दिवशी अशीच सगळी मंडळी कॅन्टीन मध्दे जमलेली होती. वाफाळलेल्या कॉफीचे घोट घेत तो कुठ्यातरी विषयावर बोलत होता.आणी बाकीचे “बरोबर बोललास हो अगदि.”म्हणुन दाद देत होती.तेवढ्यात एकदम त्याचे मुद्दे खोडुन काढ्त “ती” बोलु लागली.खुप मनापासुन….. मुद्देसुद ती आपले विचार मांडत होती. सुरवातीला तो ही तीची प्रतिभा पाहुन प्रभावित झाला. सगळे तीचे विचार मन लाउन ऐकु लागले.त्याला अशा गोष्टीची सवय नसल्याने मनातुन थोडा चीड्ला.पण तरीही आज खरच चर्चा रंगली म्हणुन आनंद ही झाला. त्याने तीला या आधी कधी ग्रुप मध्दे पाहीले न्हवते. सहज चौकशी केल्यावर कळ्ल ती त्यांच्या कंपनीत नुकतीच जॉईन झाली आहे.  त्यादिवशी रात्री त्याला काही झोप लागेना. आजचा हीचा हा विषय आवड्ता होता म्हणुन ही ईतक बोलली की खरच ही चर्चा बाहाद्दुर आहे? हे त्याला जणुन घ्यायचेच होते. त्याला तीच्याबद्दल ईर्षा झाली होती.त्या रात्री काही क्लीष्ट विषय त्याने मनात विचार करुन ठेवले.आणी मग त्याला शांत झोप लागली.

परत दोनचार दिवसातच कॅन्टीन मध्दे त्यांचा तो ग्रुप जामुन आला अर्थात ती त्या ग्रुप मध्दे होतीच. तीला पाहुन कधी चर्चा सुरु कारतो अस त्याला झाल होत. सगळयाना घरी जाण्याची घाई होती, तरी ” जाशील रे, ही कॉफी तर घे.” म्हणत सगळ्यांना त्याने कॉफी मागवीली. कोणताही विषय चर्चेस नसताना ओढुन ताणुन त्याने तो क्लीष्ट विषय काढलाच. विषयाची माहीती बरीच असल्याने तो बरच काही बोलु लागला. परत सागळॆजण त्याला दाद देवु लागले. पण आज त्याच स्तुतीवर्षावावर मुळी लक्षच न्हवत,त्याची नजर फक्त तिच्या प्रतीक्रीयेवर होती, त्याला जणु खात्रीच होती की आजही  आपल्याला दाद दिल्याशीवाय राहाणार नाही. पण झाल अगदी उलट. तीने त्याचा विषय नीट समजावुन घेतला. मनात मुद्दे तयार केले, आणी तो बोलण्याचे थांबताच हिने आपले विचार मांडायला सुरवात केली.याही विषयावर ती भरभरुन बोलु लागली. तीच्या, प्रत्येक शब्दांवर जोर देत मुद्दे मांडण्याचा हातोटीच सगळ्यानी तोंड्भरुन कौतुक केल. पण या कौतुकाने ती भारावुन गेली नाही.आपले सगळे विचार मांडुन झाल्या वर ती परत आगदी शांत बासुन राहीली. स्वताची मत मांड्ताना अगदी उफाळुन बोलणारी ” ती”  आणी आत्ताची अगदी निर्वीकार चेहर्यातली ”ही”. त्याला काहीच कळॆना. तो मनातुन खुप अस्वस्थ झाला. त्याच लाड्वलेल मन हीच्या समोर हार मानायला तयार न्हवत.घरी जाण्याच्या ओढीने सगळेच उठ्ले,त्याला अजुन वाद घलुन आपलच म्हणन खर करायच होत,  मग नाईलाजाने तो ही उठला. रस्त्यात तो फक्त तीचाच विचार करीत होता.घरी आल्यावर,जेवताना,झोपताना त्याला फक्त तीची चर्चाच अठऊ लागली. बोलताना तीचे हावभाव,आवाजातील चढ उतार, बोलताना मधे मधे चेहर्यावर येणार्या केसांना मागे सारण्याची तीची विशीष्ट पद्धत, मधुनच डोळे मोठे करुन,सगळ्यांवर टाकलेला कटाक्ष, कीती आणी कीती तरी गोष्टी.

आता मात्र तो रोजच त्या ग्रुप मद्धे येउन बसु लागला,कॉफीचे घुटके घेत घेत तीच्याशी चर्चा करु लागला.ग्रुप मद्धे आसुनही ही दोघे एकटेच कोणत्याही विषयावर चर्चा करु लागली.नंतर नंतर कोणी असो नसो यांच्यातच गप्पा सुरु झाल्या.एखाद्या दिवशी तीने ऑफीसला दांडी मारली की हा अस्वस्थ होऊ लागला. थोड्या फार फरकाने तीचीही अवस्था त्याच्यासारखीच झाली होती. त्याचा बरोबर तांसतास ती बोलत राही.त्याच्या रुबाबदार व्यक्तीमत्वाने तीला ही भुल पाडाली होती. ग्रुप मध्दे आता ती चर्चेचा विषय ठरु लागली होती. एव्हाना त्याला कळुन चुकले की आपल्या आभ्यासाची भुक फक्त हीच भागवु शकते,हीच्याशी बोलल्याने जे समाधान आपल्याला मीळते,ते ईतर कशातही नाही. तो मग खुपच अस्वस्थ होतो.रात्र रात्र त्याला झोप लागेनाशी होते. सतत तीचेच विचार मनात घोळू लागतात. डोळे मीट्ले तरी तीचाच सुंदर चेहरा त्याल दिसत असतो. तीचा विरह ईतका असाह्य होतो की, डोळ्यातुन न कळत अश्रु वाहु लागतात.  मन त्याला सांगत असत…. हीच ती… जीची तु वाट पाहात होतास….हीच तुझ आयुष्य पुर्णत्वाला नेउ शकते,…. हीच्या शीवाय तु अर्धवट आहेस…. पण…. पण.. आता हे काहीच शक्य नाही. तु खुप उशीर लावलास गं यायला….मी तुझा अता नाही होऊ शकत ….त्याच्या या अगदीगतेचा त्याला खुप राग येतो.. हाताच्या मुठी घट्ट आवळ्त अश्रुनां तो मोकळी वाट करुन देत असतो. त्याच्या शेजारीच  शांत झोपलेल्या त्याच्या बायकोला या घोंगावण्यारया वादळाची काहीच क्लपना नसते. तो एक नजर तीच्या चेहर्यावर टाकतो. तीच्या बाहुपांशाचा विळ्खा अलगद सैल करत दुसर्या कुशीवर वळतो.मनात एक ध्द्रुड निश्चय करुन झोपण्याचा उगाच प्रयत्न करीत राहातो.

मन खुपच उदास असते,कुठल्याच कामात त्याचे लक्ष लागत नाही.मग मनाशी काहीतरी पक्के ठरवुन तीला फोन करतो. दोघांच भाहेर भेटायच नक्की होत.असा फोन आपल्याला कधीतरी येणारच होता हे तीलाही माहीत असत.भेटण्याच्या ठीकाणी जायला ती जरा लवकरच नीघते,तीच्या श्वासांचा वेग वाढलेला असतो,आजुबाजुच जग ती विसरते.कुठल्याश्या धुंनदीत ती त्या जागी पोहचते. पाहातेतर तो तीच्या अगोदरच तेथे आलेला असतो. त्याला पाहुन ती जाम खुश होते.ज्या शब्दांची ती वाट पाहात असते ,आज ते शब्द त्याच्या ओठातुन बाहेर पडनार असतात. ठरल्याप्रमाणे कॉफीची ऑर्डर देवुन तो तीच्या नीरागस चेहर्या कडॆ एक नजर टाकतो….तीचा तो गोड,अधीर चेहरा पाहुन त्याचे डोळॆ भरुन येतात. पण कधीतरी यावर त्याला बोलावच लागणार असत. जड मनाने तो विषय काठतो. मी…. मी…तुला एका गोष्टी बद्दल कधी बोललो नाही…. म्हणजे तसा कधी विषयच निघाला नाही….. सुरवातीला मी फक्त तुझ्याशी गप्पा मारायचो…. तुझ्याशी वाद घालायला मला खुप आवडायच….हळु हळु मी तुझ्यात गुंतत जाऊ लागलो.तुझ्या बद्दल माहीत नाही …पण….” ती ही खुप आधीर होऊन हे सगळ ऐकत असते.मनातुन जाम खुष असते. मनातल्या मनात म्हणत असते माहीत आहे मला. पुढे बोल, जे ऐकण्यासाठी माझे कान तरसले आहेत. आणी मग तीच्या कानावर ते शब्द पडतात….”माझ लग्न झालय. त्या मुळे  तु माझ्यात गुरफटु नये.जे माझ्या बाबतीत घडतय ते तुझ्या …… तीला पुढ्चे कोणतेच शब्द ऐकु येत नसतात.डोक्यात कोणीतरी जोरजोरात घाव घातल्याचा तीला भास होत असतो…मन एकदम सुन्न होत. … डोळ्यातुन घळ्घळ अश्रु वाहु लागतात….तीच शरीर पुर्ण स्तब्द होत…अंगात काही त्राणच उरत नाही.तीचे पायही थरथरत असतात. अश्याच आवस्थेत ती तेथुन उठते.आपण एक पाउलही पुढे टाकु शकत नाही अस तीला वाट्त, पण आधार मागायचा कोणाला? जो आपला वाट्ला तोच अता परका झालेला असतो. सतत वाहाण्यारया अश्रुंना अवरत घरी पोहचते.घ्ररी गेल्यावर मात्र तीचा बांध फुटतो. खुप खुप ती रडुन घेते. ३ – ४ दिवस ती ऑफीस मद्धे पण जात नाही.खाण्या-पीण्यातुन तीच लक्ष उडालेल असत. सगळ्याचा एकत्रीत परीणाम म्हणुन तीला खुप ताप चढतो.

येथे याची पण स्थीती तशीच असते. ती ऑफीसला येत नाहीये पाहुन खुपच बेचैन होतो. तीला भेटायला जाउ का नये..याच विचारांमध्दे असतो. स्वतःच्या निर्णयावर आपण ठाम राहु की नाही याची त्याला शास्वती नसते. आणी तेवढी सदसद विवेक बुद्धी जाग्रुत असल्याने तो जाण्याचे टाळ्त असतो.असेच ५ – ७ दिवस उलटुन जातात. ती अजुनही कामावर आलेली नसते.शेवटी चौकशी अंती कळत ती अजुनही आजारीच आहे. मग मात्र त्याला राहावत नाही. तो एक s m s   करतो.”तु कशी आहेस? ऑफीस मदधे ८ दिवस झाले आली नाहीस.”

घ्ररी ती त्याच्याच विचारात पड्लेली असते.आणी तीतक्यात मोबाईल वाजतो.ईच्छा नसतानाही ती तो SmS  उघड्ते. त्याचा मॉसेज पाहुन तीला खुप आनंद होतो.आणी डॊळ्यातुन नकळ्त आश्रु वाहु लागतात, परत त्याला काय उत्तर द्यावे ,याच विचारात ती असते.कारण हीच वेळ दोघांच्याही परीक्षेची असते.आधी फक्त आपलाच वाट्णारा तो आता तीला परका झालेला असतो. येथे अजुन उत्तर येत नाही म्हणुन याची ही बेचैनी वाढ्त चाललेली असते. शेवटी बराच वेळ वाट पाहुन तो तीला फोनच करतो. परत मोबाईलची रींग वाजते तेंव्हा ती फोन घेते.ईतक्या दिवसानंतर त्याचा आवाज ऐकुन तीचा बांध फुट्तो.ती फोन वरच रडु लागते. आता मात्र त्याला धीर धरवत नाही.आपली गाडी काढुन तो सुसाट वेगाने तीच्या घरी जाण्यास नीघतो. वाटॆत अनेक वीचार मनात येतात… तीला समजवुन परत तीची गाडी रुळवर आणु …  वैगेरे. एव्हाना तीच घर येत. गाडी पार्क करुन तो वर जातो दार बंद असते. बेल वाजतो. एकदा…..दोनदा….. तीनदा…. ती दार उघडे पर्यंत पण याला धीर नसतो. ती कोण बेल वाजवतय म्हणुन दार उघड्ते.समोर याला पाहुन  परत ती रडु लागते.तीला सावरण्यासाठी तो तीचा हात पकड्त बेड वर नेतो. तीच्या अगांत चांगलाच ताप आहे.हे त्याच्या लक्षात येत.कसेतरी समजवुन तीला डॉक्टर कडे घेवुन जातो,परत येताना सगळी औषधे  घेवुन येतो.तीला नीट झोपवुन तो तेथुन नीघतो. रात्र भर त्याला झोप लागत नाही, ”आपल्या मुळे आज तीची ही अवस्था झाली.या परक्या गावात तीच कोणही नाही. अशा स्तीथीत कोण पाहील तीला? ”

दुसरया दिवशी सकाळीच उठतो. ऑफीसला जायला नीघतो पण गाडी आपोआप तीच्या घरच्या दिशेने वळते…. एव्हाना तीचा तापही कमी झालेला असतो,डोळे मात्र रात्र भर रड्ल्याची चुगली करीत असतात.याला परत घरी आलेल पाहुन तीला खुप आनंद होतो. तीचा ताप गेला की नाही पाहाण्यासाठी तो आपला हात तीच्या कपळावर ठेवतो. त्याच्या त्या पहील्या स्पर्शाने तीचा कणनकण मोहरुन उठ्तो.तीचे डॊळॆ आपोआप बंद होतात. तीचा ईतका सुंदर चेहरा पाहुन त्याच्याही ह्रुदयाची धड्धड वाढ्लेली असते. आपण जीच्यावर ईतक प्रेम करतो तीला जवळही घेवु शकत नाही…. ही असाह्यता त्याच मन पोखरुन टाकते. त्याला कळ्त आता ईथे थांबलो तर स्वताला आवरण शक्य नाही…. आणी मग तो पट्कन आपला हात मागे घेत जाण्यासाठी वळतो. त्याला जाताना पाहुन ती ही बेचैन होते.मागचा पुढचा विचार न करता धावत जाउन त्याला मीठी मारते. तीचा अवेग पाहुन त्याला ही राहवत नाही.तीला जवळ घेवुन तीच्यावर तो प्रेमाचा वर्षाव करत असतो.आणी ती त्यात न्हाउन नीघत असते.आणी मग अचानक तीला जाणीव होते. हे चुकीच आहे.ती चटकन त्याच्या पासुन दुर जाते.त्याच्याही ही गोष्ट लक्षात येते . जेव्हा  तो तेथुन जाण्यास नीघतो,तेव्हा  आता परत कधीही एकमेकांना भेटायच नाही हे अश्वासन घेवुन.

ऑफीस मध्दे जातो पण सगळ लक्ष त्याच तीच्यातच असत. खर पाहाता आज तो सुखात न्हाहात असतो. झालेल्या गोष्टींची दहादा उजळणी करत स्वताच स्वताशी हासत असतो.तीच्या स्पर्शाने, तीच्या सौद्र्याने तो अगदी वेडा झालेला असतो. तीची ही अवस्था तशीच असते. मग प्रत्येक वेळी शेवट्चीच भेट म्हणत ती दोघे भेटतच जातात.आणी मग त्यांना अता कळुन चुकत की आपण आता एकमेकांशीवाय नाही राहु शकत. मग एक दिवस मुहुर्त पाहुन ४ – ५ मीत्र मैत्रीणींना घेवुन ते वैदीक पद्ध्तीने लग्न करतात. त्याने तीच्यासाठी एक नवीन फ्ल्याट घेतलेला असतो.लग्न अटोपल्यावर सगळ्यांना एक मोठी पार्टी देवुन ते आपल्या नवीन घरी जातात. आत गेल्यावर तो दार लावुन घेतो.ती आज खुपच सुंदर दिसत असते. तीला न्याहाळ्त तो तीला जवळ घेतो. आज त्यांची मीलनाची रात्र असते.आज ते सगळ्या बंधनातुन मुक्त असतात.त्याच्या प्रेमाचा प्रचंड आवेग पाहुन ती ही स्वतःला त्याच्या पुर्ण स्वाधीन करते.आज पुर्ण अर्थाने ती त्याची झालेली असते. काही काळ असाच जातो. रात्रीचे बारा साडॆबारा झालेले असतात. तो उठतो. तयार होऊ लागतो. ती त्याला विचारते “अत्ता या वेळी कुठे नीघालात?” तो खुप जड आवाजात बोलतो ”मला त्या घरी गेल पाहीजे.ती घरी एकटी आहे? तीला अजुन यातल काही माहीत नाही.”त्याची वाक्य ऐकुन ती एकदम स्तब्ध होते.डोळ्यातुन पाणी येवु लागत.कसबस ती ईतकच म्हणते ” आज आपली पहीली रात्र ना? तुम्ही मला अस सोडुन कस जाउ शकता?” तो तीला समजावुन तेथुन नीघतो.त्या दिवशी मात्र तीचे डोळे खाड्कन उघडतात.बापरे या विषयावर आपण याच्याशी कधी बोललोच नाही.अता रोजच आपण आसे एकटे राहाणार?  तीला तो आपल लग्न झालय हे काधी सांगु शकेल की नाही? आई – वडीलांशी पण नात तुट्लय. मागचे सगळॆ दरवाजे अता बंद झालेत.या चार भींतीतच आपल्याला आयुष्य काढाव लागेल का? त्याची बायको म्हणुन आपल काही स्थान असेल का?अशा अनेक प्रश्नांचा भडीमार तीच्या मनावर होत असतो. डोळ्यातुन ओघळ्णारया अश्रुंन शीवाय तीच्या हातात काहीच उरलेल नसत……

क्रमशाः……


एक खरी कहाणी

July 21, 2006

 ही कहाणी आहे, बैल नाही म्हणून पोटच्या गोळ्यांना नांगराला जुंपणाऱ्या दुर्दैवी बापाची अन्‌ हे दृश्‍य नजरेस पडल्यावर  मन  आक्रोंदुन गेलेल्या एक”बाप” माणसाची! या वास्तवाला सामोरा जाणारा शेतकरी नायक आहे भीमराव गोविंद मुळे !.. महानायक मात्र वेगळाच ! ….
..हंगाम आला. बैलजोडी नाही. जवळ पुंजीही नाही. काय करायचे? भीमराव मुळेंना ही चिंता सतावत होती. गात्रे थकलेली. उधार-उसणवारीची सोय नाही. मुलीचे लग्न याच वर्षी झाले. ६१ हजारांच्या हुंड्यासह खर्चाची रक्‍कम एक लाखावर गेली. १५ हजार कमी पडले म्हणून काळजावर दगड ठेवत बैलजोडीही बाजारात न्यावी लागली. बैल विकले. मुलगी सासरी गेली.
भीमरावांना वाटले जबाबदारीतून सुटलो; पण हंगाम आला, तो समस्यांचा डोंगर घेऊनच. पीककर्जाचे प्रकरण बॅंकेत धूळखात पडलेले. गेल्या वर्षी विकलेल्या बियाण्यांची रक्कम अजून मिळालेली नाही. भरीस भर म्हणजे, निवृत्तिवेतनावर आधीच कर्ज काढलेले. १,४०० रुपये हप्ता दरमहिन्याला कापणे सुरू होते. गावात “पत’नसल्याने सावकारही दारात उभे राहू देईना. शेती केली नाही, तर हप्ता भरायचा कोठून?…साऱ्याच समस्या. मात्र, आयुष्यभर खपलेला गडी खचणार कसा? समाजव्यवस्था आणि लोकनिंदा बाजूला सारत मुलांनी खंबीर साथ दिली. शेतात चर काढण्यासाठी भीमरावांनी स्वतः नांगर हाती घेतला. ह्रदयाला चरे पडत असतानाही दोन्ही मुलांना नांगराला “जुंपले”.यातील निवृत्तिवेतनाचा संदर्भ स्पष्ट केला, तर व्यवस्थेतील विदारकता अधिक प्रकर्षाने पुढे येते. भीमराव निवृत्त सैनिक आहेत. ते आग्रा येथे होते. देशासाठी लढणाऱ्या एका वृद्ध सैनिकाला शत्रूने नव्हे, तर परिस्थितीनेच दगा दिला. गारद मात्र केले नाही.”बॉण्ड’ संपला, आयुष्यासोबत रोजची लढाई सुरू झाली… रांगड्या नायकाला मुलांची समर्थ साथ लाभली म्हणून ठीक; अन्यथा शेतीसोबत त्यांचे आयुष्यही करपून गेले असते……अन तो आला!
अशीच एक दुपार. टळटळीत. थोडाफार पाऊस येऊन गेल्याने उकाडाही वाढलेला. शेतीत मुलांच्या सोबतीने भीमरावांची नांगरणी सुरू होती. डॉ. हिंमतराव बावस्कर कारने जात होते. विंचू आणि सर्पदंशावरील ज्यांचे संशोधन जगन्मान्य झालेय, तेच हे डॉ. बावस्कर. वैद्यकीय व्यवसायात पैसा मिळत असला; तरी डॉक्‍टरांचा शेतीवर फार जीव. गावात त्यांनी खास शेत विकत घेतले. शेतात आंब्याची लागवड करायची;  गावातून कलमा आणायला ते निघाले. रस्त्यातच भीमरावांच्या शेतातील दृश्‍य त्यांच्या नजरेला पडले. त्यांनी लगेच गाडी थांबविली. थोडावेळ दूरूनच निरीक्षण केले. डॉक्‍टर आणि त्यांची दोन मुले आलिशान कारमध्ये होती, तर भीमराव आणि त्यांची दोन मुले शेतात. रणरणत्या उन्हात. विंचूदंशावर संशोधन करणाऱ्या डॉक्‍टर बावस्करांना शेतातील दृश्‍याने तर अंतर्बाह्य दंश केला. त्यांचे काळीज गहिवरले. व्यवस्थेवर आघात करणारे हे दृश्‍य त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले आणि दोन्ही मुलांसह थेट शेत गाठले. चोवीसशे रुपयांच्या निवृत्तिवेतनातून पाचसातशे रुपये हाती पडणारे भीमराव संसाराचा गाडा कसा ओढत असतील? काय करायला हवे? डॉक्‍टरांना काळजीने वेढले. घाई असल्याने ते घरी परतले. भीमरावांच्या परिस्थितीने त्यांची झोप उडाली.  सकाळी उठून त्यांनी सारी तळमळ आपल्या मित्राला कळविली. लागलीच तयारी केली आणि ते दोघेही निघाले पुन्हा भीमरावांच्या शेतात. बैलजोडी घेण्यासाठी डॉक्‍टर बावस्करांनी १० हजारांचा चेक भीमरावांच्या हाती दिला, तेव्हा त्यांची तगमग दूर झाली. एक दडपण दूर झाले होते.
नात्यापात्यातील नसतानाही एका बळीराजाची वेदना डॉक्‍टरांनी वेचली.  जुंपलेल्या जोडीचा “भाव’ करण्यापेक्षा त्याचे मोल त्यांनी जाणले. भारत महासत्ता होणार, असा डीडींम पिटणारे आणि त्या नादात आत्ममग्न असलेले स्वयंघोषित पुढारी या घटनेपासून काही बोध घेणार की नाही? डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्याबद्दल अधिक सांगायचे तर, “बॅरिस्टरचं कार्टं’ हे त्यांचे चरित्र यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. मुंबईच्या मॅजेस्टिक प्रकाशनाने ते प्रसिद्ध केलेय. त्याला पुरस्कारही मिळालेत. डॉक्‍टरांनी केलेला माणुसकीचा पुरस्कार आपल्या साऱ्यांसाठीच महत्त्वाचा. वय झाल्यावरही उमेद न सोडणारे भीमराव या कहाणीचे नायक आहेत, तर दान दिल्यावरही गाजावाजा न करता निमूट निघून जाणारे डॉ. बावस्कर महानायक. आणि हो, भीमराव गोविंद मुळे. वय ६०.  यांनी डॉ. बावस्करांची पाई पाई फेडण्याची हमी स्वतःहून दिली आहे. भीमराव म्हणतात, “”माझी उमर अजून बाकी आहे आणि माझ्या पोरांची जिद्ददेखील !”